Saturday, 18 June 2016

*** ईएम – उपयुक्त परंतू दुर्लक्षित द्रावणे ***

*** ईएम – उपयुक्त परंतू दुर्लक्षित द्रावणे ***


ईएम (EM) म्हणजे इफेक्टिव्ह मायक्रोऑरगॅनिझम्स (Effective Micro-organisms). ही अपघाती तयार झालेली, नैसर्गिक, सजीव जिवाणूंचा समावेश असलेली, परिणामकारक द्रावणे आहेत. ही द्रावणे सेंद्रीय शेतीमधील महत्त्वाचा घटक असून या द्रावणांचा शोध १९८० च्या सुमारास फलोत्पादन तद्न्य डॉ. टेरूओ हिगा यांनी युनिवर्सिटी ऑफ रायुक्युस, ओकिनावा, जपान येथे लावला. सद्यस्थितीत या द्रावणांचा संपूर्ण जगात वापर होत आहे. या द्रावणांमध्ये एकूण ८० जिवाणूंचा समावेश असला तरी यामध्ये प्रामुख्याने लैक्टिक एसिड बैक्टेरिया (Lactobacillus sp.), फोटोसिंथेटिक बैक्टेरिया (Rhodopseudomonas sp.) आणि यीस्ट (Saccharomyces sp.) या जिवांणूंचा समावेश असून ही द्रावणे मानव, प्राणी आणि निसर्गासाठी सुरक्षित असल्याचे सिद्ध झालेले आहे. या द्रावणांचा वापर शेती, सेंद्रिय खतनिर्मिती, पशुपालन, कुक्कुटपालन, घन कचरा व सांडपाणी व्यवस्थापनामध्ये फायदेशीर दिसून आला आहे. तसेच ही द्रावणे कीड आणि रोग समस्या टाळण्यासाठी सुद्धा वापरतात.
जागतिक पातळीवर इम्रो (EMRO-EM Research Organization) नावाची संस्था अधिकृत ईएम द्रावण बनविते, तर २००१ सालापासून भारतात मँपल ऑर्गटेक लि., कोलकाता (Maple Orgtech Ltd., Kolkata) ही कंपनी अधिकृतरित्या जपानच्या तंत्रज्ञानाने ईएम द्रावणे तयार करत आहे. ईएम-१ या द्रावणासोबतच या कंपनीचे झाडांचे/पिकाचे किडींपासून रक्षण करण्यासाठी - टर्मिन (Termin), संप्रेरके - प्राईमो (Primo) व प्लेंटी (Plentee), माती सुधारक - ईएम पॉवर (EM Power) व ईएम रिच (EM Rich) आणि खतानिर्मिती - बोकाशी (Bokashi), इत्यादी कार्यक्षम (एक्टीवेटेड) द्रावणेही बाजारात उपलब्ध आहेत. बोकाशी हे एक भूसा, गव्हाचा कोंड्यापासून बनविलेले कडक स्टार्टर आहे.
मूळ ईएम द्रावणामधील सूक्ष्यजीव जिवंत असले तरी ते सुप्त अवस्थेत असतात, त्यांना कार्यरत (एक्टीवेट) करण्यासाठी व आर्थिक बचत करण्यासाठी दुय्यम द्रावणे तयार करतात. ही द्रावणे मूळ द्रावणाइतकेच परिणामकारक असतात. या द्रावणांचा कमी प्रमाणात परंतू नियमित वापर करावा.
१. ईएम-२ द्रावण तयार करण्याची पद्धत :
ईएम-२ हे द्रावण तयार करण्यासाठी २० ते २५ लिटर आकारमानाचे १ किंवा २ टोपण असणारे कंटेनर (प्लास्टिक ड्रम/कँन) निवडावे. त्यामध्ये १७ लिटर पाणी घेऊन त्यात १ लिटर ईएम-१ द्रावण व २ किलो गूळ (सेंद्रिय गूळ असेल तर उत्तम) टाकून हे मिश्रण चांगल्या प्रकारे ढवळून घ्यावे. हवाबंद करून हे कंटेनर एकसमान तापमान असणाऱ्या थंड व अंधाऱ्या जागी ठेवावे. फ्रीजमध्ये ठेऊ नये. कंटेनरला २ टोपण असतील तर कंटेनरमध्ये निर्माण होणारे वायू बाहेर काढणे सोपे होते. परिणामी, अंबाविण्याची क्रिया चांगली होते. दिवसातून १ किंवा २ वेळा कंटेनरचे टोपण उघडून द्रावण ढवळून त्यातील निर्माण झालेले वायू बाहेर सोडून द्यावे. असे न केल्यास आतमध्ये निर्माण होणाऱ्या वायूंमुळे कंटेनर फुटण्याची दाट शक्यता असते. सर्वसाधारणपणे ५ ते ८ दिवसांनंतर द्रावणावरती पांढरा थर जमा झालेला दिसेल आणि द्रावणाचा आंबट-गोड वास येईल, तेव्हा ईएम-२ हे कार्यक्षम द्रावण तयार झाले असे समजावे. चवीलाही हे द्रावण आंबट-गोड असते. पिवळसर तपकिरी रंगाचे हे द्रावण ३० दिवसांपर्यंत वापरण्यास योग्य असते, त्यानंतर त्यास दुर्गंधी सुटते. हे द्रावण तयार करण्यासाठी शुध्द पाणी वापरावे. कूपनलिकांचे, विहिरींचे पाणी वापरू शकता. अशुद्ध पाणी (क्लोरीन, डीडीटी, ई. मिश्रित) असेल तर ते पाणी कोळश्यातून गाळून घ्यावे.
२. ईएम वनस्पतीजन्य अर्क (EMFPE- EM Fermented Plant Extract) तयार करण्याची पद्धत :
या अर्कामध्ये जैविक पदार्थ, सेंद्रिय आम्ले, मूलद्रव्ये, इत्यादी घटक असतात. हे अर्क तयार करण्यासाठी ईएम-२ द्रावण तयार करण्याची पद्धत वापरावी. तण; झुडुपांचे (बारीक केलेले) भाग २० ते २५ लिटरच्या कंटेनरमध्ये २ लिटर मळी (३ ते ४ टक्के प्रमाण) किंवा ५०० ग्राम गूळ (सेंद्रिय गूळ असेल तर उत्तम) व १ लिटर ईएम-१ द्रावण घेऊन त्यात १७ लिटर पाणी टाकून हे मिश्रण चांगल्या प्रकारे ढवळून घ्यावे. औषधी वनस्पती, उग्र तणांचा यामध्ये वापर करावा. उदा. कडूलिंबाची पाने, पपईची पाने, कोरफड, घाणेरी, गवती चहा, लव्हाळी, बेशरम, पुदिना, सब्जा, इत्यादी. वनस्पतींचे भाग बारीक करण्यासाठी पाटा-वरवंटा किंवा मिक्सर वापरावा. सर्वसाधारणपणे ५ ते १० दिवसांनी विरजण्याची क्रिया पूर्ण होऊन हे अर्क तयार होते. हे तयार झालेले २० लिटर अर्क गाळून वापरावे, उरलेला चोथा कंपोस्ट खड्ड्यात किंवा झाडाभोवती चर काढून गाढून टाकावा. या अर्काला आंबट-गोड; तिखट वास असतो, ते ९० दिवसांपर्यंत वापरता येते. दुर्गंध येत असल्यास हा अर्क वापरू नये. हे अर्क १५-२० मि.लि. प्रती लिटर पाण्यातून जमिनिद्वारे द्यावे किंवा ३०-४० मि.लि. प्रती लिटर पाण्यातून फवारणी घ्यावी.
३. ईएम प्रतिबंधक द्रावण (ईएम-५) तयार करण्याची पद्धत :
या द्रावणाचा वापर विविध किडी तसेच रोग प्रतिबंधक संरक्षक कवच म्हणून करतात. हे द्रावण तयार करण्यासाठी १ लिटरची घट्ट झाकण असलेली बरणी घ्यावी. त्यात १०० ग्राम गूळ (सेंद्रिय गूळ असेल तर उत्तम) घेऊन ५०० ते ६०० मि.लि. कोमट पाणी टाकावे. त्यात १०० मि.लि. विन्हेगर, १०० मि.लि. लिटर ईथील अल्कोहोल (दारू) व १०० मि.लि. ईएम द्रावण टाकून हे मिश्रण चांगल्या प्रकारे ढवळून घ्यावे. द्रावणाची प्रत अजून उंचावण्यासाठी यात प्रत्येकी २५ ग्राम लसूण, हिरवी मिरची व कोरफड बारीक चिरून टाकतात. बरणीचे झाकण घट्ट बसवून ती बरणी सावलीमध्ये, उबदार जागेत ठेवावी. दिवसातून १ किंवा २ वेळा झाकण उगडून, बरणी हलवून त्यात निर्माण होणारे वायू बाहेर सोडून द्यावेत. ५ ते १० दिवसानंतर या द्रावणाला गोड वास येतो, तेव्हा ते वापरण्यास तयार झाले असे समजावे. हे द्रावण ९० दिवसांपर्यंत वापरता येते. वनस्पतींचे भाग किंवा गोमुत्र, काकवी आणि ईएम १०:१:१ या प्रमाणत घेऊनही हे द्रावण (ईएम-५ द्रावण) तयार करता येते.
१ मि.लि. ईएम-५ द्रावण प्रती लिटर पाण्यात जमिनीतून द्यावे किंवा २ मि.लि. प्रती लिटर पाण्यातून द्रावणाची फवारणी करावी.

ईएम-२ द्रावाणाचा वापर :
१. शेतीमधील वापर :
अ. फवारणीद्वारे – १००-१२० लिटर पाण्यात २ लिटर ईएम-२ मिसळून फवारणी घ्यावी. सकाळी किंवा पाऊस पडल्यानंतर केलेली फवारणी जास्त परिणामात्मक ठरते. आठवड्यातून एकदा झाड/पीक पूर्ण भिजेल अशी फवारणी करावी. ‘लीफ स्कॉर्चींग (Leaf Scorching)’ टाळण्यासाठी सकाळी लवकर किंवा सूर्य मावळल्यानंतर फवारणी करावी. पिकांना किडींपासून संरक्षण देण्यासाठी रोपवाटिकेमध्ये निरोगी व सक्षम रोपे निर्माण करण्यासाठी ईएम-२ द्रावणाची फवारणी घ्यावी.
ब. जमिनीद्वारे – १०० लिटर पाण्यात ४ ते ५ लिटर ईएम-२ द्रावण घेऊन आळवणी करावी. ईएमची केल्यानंतर रोपांना/पिकाला/झाडांना मुबलक पाणी द्यावे. बारमाही पिकांस महिन्याच्या अंतराने एकदा असे ३ ते ४ वेळा तर कमी कालावधीच्या पिकांस २० दिवसांनी एकदा असे २ वेळा द्यावे.
फळझाडांना आठवड्यातून एकदा ठिबक सिंचनातून व्हेंचुरी किंवा फर्टीलाइझर टेंकद्वारे ईएम-२ द्रावण सोडावे. ईएम द्रावणामध्ये कोणत्याही प्रकारचे रासायनिक खते व औषधे मिसळू नये. ईएम-२ द्रावण व रासायनिक खते एकाच वेळी सोडायची झाल्यास प्रथमतः १५ मिनिटे पाणी सोडावे. नंतर १५ मिनटे खते सोडावीत. खते सोडल्यानंतर परत १५ मिनटे पाणी सोडावे आणि नंतर ईएम-२ द्रावण सोडावे. ईएम-२ द्रावण सोडून झाल्यानंतर परत १५ मिनटे पाणी सोडून ठिबक बंद करावे. झाडांचे वय लक्षात घेऊन आळवणीमध्ये बदल करावा. पिकाला/झाडांना शेणखत/सेंद्रिय खत देण्या अगोदर हे द्रावण सोडले तर मातीतील कर्बाचे प्रमाण उल्लेखनीयरित्या वाढते.

२. खतनिर्मितीमधील वापर – शेतातील तण, पिक अवशेष जमिनीपासून ५ सें.मी. अंतरावर कापून घ्यावे. कापलेले गवत जमिनीवर आच्छादन करून त्यावर आठवड्याला ईएमची फवारणी केल्यास तण, पिकाचे अवशेष कुजून जमिनीस खत तयार होते.
कंपोस्ट बनविताना ढीगावर ईएमची फवारणी केल्यास कंपोस्ट लवकर तयार होते तसेच कंपोस्ट तयार होताना येणारी दुर्गंध येत नाही, तसेच चिलटे, माश्या नियंत्रित होतात.

३. पशुपालन आणि कुक्कुटपालनमधील वापर - साधारणपणे १०० लिटर पाण्यात एक लिटर ईएम-२ हे द्रावण मिसळून पशुपालन आणि कुक्कुटपालन व्यवसायाच्या ठिकाणी फवारणी करावी.
ईएम द्रावणाचे वापरानुसार प्रकार व दर :
सद्यस्थितीमध्ये बाजारात अनेक खाजगी कंपन्यांचे ईएम द्रावणे, पावडर्स उपलब्ध आहेत, परंतू त्यांची कर्यक्षमता अविश्वासनीय असल्याने अधिकृत निर्मिती परवाना असलेल्या कंपनीचेच ईएम द्रावणे विकत घ्यावीत. ईएम द्रावणांच्या किंमती सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे आहेत.
अ.क्रं. ईएम प्रकार दर (रुपये/लिटर)
१. शेतीसाठी ३२५-३७५
२. पशुपालन, कुकुट्टपालन ४००-४५०
३. सेद्रींय पदार्थ कुजविणेसाठी ३७५-४२५
४. सांडपाणी व्यवस्थापनासाठी ५००-५५०

ईएम द्रावणांचे फायदे :
• ईएम द्रावणांच्या वापरामुळे बी उगवण क्षमता वाढते.
• ईएम द्रावणांच्या वापरामुळे झाडाची अन्न्यद्रव्ये शोषून घेणारी क्षमता वाढते, परिणामी पिकाची चांगली वाढ होते.
• ही द्रावण जमिनीमध्ये 'अँटिओक्सिडेंड'चे काम करून पीकवाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करतात.
• रोपवाटिकेमध्ये ईएमचा वापर केल्यामुळे रोपांच्या मुळांची वाढ चांगली होते, रोपे तजेलदार होतात.
• सर्व फळपिकांमध्ये वापर करता येऊ शकत असला तरी विशेषतः ईएम द्रावणांच्या वापरामुळे केळी पिकाची एकसारखी वाढ होते. मोसंबी, संत्र्याच्या झाडांना फुले लागण्याचे प्रमाण वाढते, फळधारणा चांगली होते. तसेच फळांची गुणवत्ता वाढते. चिकू, पेरू, डाळिंब, द्राक्ष या फळपिकांमध्येही ईएम द्रावणांमुळे उत्पन्न व गुणवत्ता वाढते.
• सेंद्रिय घटकांच्या वाढीमुळे पीकांच्या पांढऱ्या मुळ्या वाढतात. विशेषतः ऊस या पिकाची वाढ चांगली होते. मुळांची वाढ, पेरांची संख्या, फुटव्यांची संख्या, तसेच पेऱ्यातील अंतर वाढते. ईएम द्रावणांच्या वापरामुळे तृनधाण्यात ५० टक्क्यांपर्यंत उत्पन्नात वाढ होऊ शकते.
• ही द्रावण आम्लधर्मी असल्यामुळे ठिबक सिंचन संचामध्ये अडकणारे क्षार विरघळून जातात. शेवाळ वाढत नाही.
• बाजारातील इतर सेंद्रिय तसेच रासायनिक औषधांपेक्षा ईएम द्रावण स्वस्त असल्याने उत्पन्न खर्चात बचत होते.
• या द्रावणांचा सामू सर्वसाधारणपणे ३.५ ते ३.८ इतका असतो. जमिनीचा वाढलेला सामू कमी करण्यासाठी या द्रावणाच्या वापर करतात.
• मातीतील जीवाणूंच्या कार्याला मदत करून मातीतील जैविक वातावरण सुधारण्यास मदत करते.
• जिवाणू खतांचा ईएम सोबत केलेला वापर जास्त परिणामकारक दिसून येतो.
• जमिनीच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामध्ये चांगल्या पद्धतीचा परिणाम दिसून येतो.
• या द्रावणांच्या वापरामुळे पालापाचोळा लवकर कुजतो तसेच जमिनीतील सेंद्रिय पदार्थही लवकर कुजतात.
• गांडूळ खताच्या वाफ्यावर याची फवारणी केली असता लवकर खत तयार होण्यास मदत होते.
• काही देशांमध्ये या द्रावणांचा प्रभावशाली वापर दूषित पाणी शुद्धीकरण प्रणालीत करत आहेत.
• ही द्रावणे पर्यावरण रक्षणात महत्त्वाची भूमिका बजावतात.
• ईएम द्रावणाची शेतीपूरक व्यवसाय करण्याच्या ठिकाणी फवारणी केली असता तेथील दुर्गंधी कमी होते, डास, चिलटे, माश्या कमी होतात.
हानिकारक जंतूंनी दूषित परीसंस्था बदलून तिचे रुपांतर उत्पादक परिसंस्थेत करणारी, माफक किमतींमध्ये मिळणारी हि द्रावणे आपल्या देशात दुर्लक्षितच आहेत. त्यांचा वापर वाढविणे ही काळाची गरज आहे.
बाजारात अनेक खाजगी कंपन्यांचे ईएम द्रावणे उपलब्ध आहेत, खरेदी
करताना त्यांची गुणवत्ता तपासावी. ईएम द्रावणांसाठी आपल्या भागातील
संदिप जगताप यांना संपर्क करावा .+919765040066
+919552057800

Monday, 13 June 2016

सेंद्रिय शेती

सेंद्रिय शेती
सेंद्रिय शेती
सेंद्रिय शेती व प्रकियांचे मुख्य उद्देश

सेंद्रिय शेती आणि प्रक्रियापध्दती अनेक मुलतत्त्वांवर व कल्पनांवर आधारित आहे. पुरेश प्रमाणात उच्च पौष्टिक दर्जा असलेले खाद्यान्न उत्पन्न करणे.निसर्गाची निश्चित प्रणाली व कालचक्र आपल्या क्रियांनी अधिक संपन्न होईल असे विधायक कार्य करणे.शेतीतील सुक्ष्मजीव, वनस्पती व प्राणीजात यांचा जीवचक्राची वाढ होण्यास प्रयत्नशील असणे.जमीनीची सुपीकता वाढवून सुक्ष्मजीव व प्राणीजात याचा निर्वाह / प्रतिपाळ करणे.पाण्याचा योग्य वापर व जलाचरांचे संवर्धन करणे.भूमी व जल यांचे संरक्षण करणे.शक्यतो ज्याचे नुतनीकरण होऊ शकेल असे शेतीतील घटक व उपलब्ध स्थानिक आवश्यक घटकांचा आधार घेवुन सेंद्रिय शेतीची जुळणी करणे.सेंद्रिय पदार्थ व पोषक द्रव्ये यांचे शेतीतील नियमन करतांना शक्यतो सेंद्रिय शेतातीलच किवा स्थानिक सेंद्रिय पदार्थाचा उपयोगाने एकत्रित मिळतील अशी व्यवस्था करणॆ. सेंद्रिय शेतीत प्रयुक्त होणारा कच्चामाल आदी पुन: वापर किवा नुतनीकरण करता येण्याजोगा असावा.सर्व पाळीव प्राण्यांचे नैसर्गिक व्यवहार कायम राहील अशी परिस्थिती असावी. शेती पध्दतीतून निर्माण होणारे सर्व प्रकारचे प्रदुषण कमी होईल याची काळजी घ्यावी.शेती, परिसरातील वनस्पती ,उपयोगी गुरे व वन्यप्राणी यांच्यातील अनुवंशिक विविधतेचा साभाळ करणे. देशी बि-बियाणे, धनधान्याच्या जाती व प्राण्यांच्या जाती यांची जोपासना व वाढ करून त्या विषयाचे देशी व पारंपारिक ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करणे. सेंद्रिय उत्पादन व प्रक्रियेत समाविष्ट असणा-या सर्वाना दर्जेदार जीवन प्रदान करून संयुक्तराष्ट्र मानवी हक्क समित्याच्या नियमावलीत सांगितल्याप्रमाणे कामाचा मोबदला, मूळ गरजा,कामाविषयीचे समाधान व सुरक्षित कार्य विषयक परिस्थिती जुळवून आणावी. शेती पध्दतीचा सामाजिक व पारिस्थितीक परिणामांचा योग्य विचार करणे.
सेंद्रिय शेती प्रक्रियेतील आवश्यक गोष्टी
सेंद्रिय शेती चळवळीचे मुख्य ध्येय साध्य होण्यासाठी काही तंत्र वापरले आहेत ज्यात मुख्यत्वेकरून नैसर्गिक परिस्थितीत संतुलनाला महत्त्व दिले आहे. मुख्य ध्येयाच्या विरोधात जातील अशा उत्पादन पध्दतीचा समावेश टाळला आहे. मूलत: बागायत ,शेती व वनसंवर्धनाच्या शास्त्रात उत्पादन हे जमिनीचा कस (सुपीकता),मातीची संरचना वातावरण व प्रयुक्त वनस्पतीच्या जातीवर अवलबून आहे उत्पादन वाढीसाठी सेंद्रिय शेती पध्दतीत खालील तंत्राचा वापर होतो.
- पिकांचे नियोजन
- सेंद्रिय पदार्थाचे नूतनीकरण आणि उपयोग
- कीटक,रोग व तूण नियंत्रणाकरीता कूत्रिम खत,कीटकनाशके व तूणनाशकांचा वापर टाळून इतर अन्य पध्दतीचा समावेश
- पशुसंवर्धनाच्या बाबतीत मूलत: पोषक व परिस्थितीत त्यांच्या गरजावर भर दिला आहे.
- चांगल्या दर्जाचे पुरेसे सेंद्रिय खाद्य उपलब्ध करणे.
- गुरांच्या नैसर्गिक व्यवहार व गरजाप्रमाणे त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणे,योग्य पशुचिकित्सा.
    सेंद्रिय कूषि पध्दतीत पशुपक्षांचे महत्त्वाचे स्थान आहे.कारण पशुपक्षी पोषक द्रव्याचा नैसर्गिक प्रवाह कायम ठेवतात. सेंद्रिय पदार्थाचे रुपातर करुन जमिनीची सुपीकता वाढविण्यास प्रामुख्याने मदत करतात.काही जातीचे पशुपक्षी शेतीचा काही भाग वापरात आणतात जो अन्यथा वापरात आणल्या जात नाही.
जमिनीवर चा-याची शेती केल्याने पीक फेरपालटाला मदत होऊन सेंद्रिय शेती पध्दतीतील विविधता व संतुलन साधण्य़ाच्या मदत होते. त्यांचा उपयोग ओझे वाहून नेण्याकरिता होतो. सेंद्रिय शेतीपासून मिळण्याच्या गौण उत्पादनाचा पशुपक्षी उपयोग करु शकतात. उत्पदन्न वाढविण्यास मदत करतात.
पशुसंवर्धन व कूषिउद्योग ह्यांच्या समन्वयानेच नैसर्गिक परिस्थितीत समतोल साधणे शक्य आहे.सेंद्रिय खत पशुखाद्य या बाबतीत स्वावलंबी असणे, आवश्यक त्या प्रमाणात साठा करून ठेवणे ,मानवाच्या पोषणाकरिता सेंद्रिय शेतीवर पीक उत्पादन व गुरांच्या पोषणाकरिता चारा उत्पादन याचा समतोल साधावा कारण वनस्पती प्रथिने व उर्जा यांचे परिवर्तन प्राणि प्रथिने व उर्जा यात होत असतांना चयापचयन क्रियेत काही उर्जा नष्ट होते.
सेंद्रिय उत्पादनावरील पुढील काही प्रक्रियेत उत्पादनाचे मूळ गुणविशेष कायम रहावे ह्याकरिता खालील उपाय दिले आहेत.
घटकांच्या विशिष्ट गुणांवर परिणाम होणार नाही अशी निवडक प्रक्रिया विकसीत करणे
योग्य मानके विकसीत करणे ज्याद्वारे काळजीपूवक प्रक्रिय मर्यादित परिषकरण, उर्जा बचत तंत्र, न्युनतम समावेशी व साहाय्यक पदार्थाचे उपयोग हे ध्येय साध्य करता येईल.
सेंद्रिय उत्पादन व त्याची हाताळणी करताना पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी टाकावु पदार्थाच्या व्यवस्थापनाचे संबंधित,गठ्ठे बांधण्यास प्रयुक्त सामग्री,उर्जा बचत पध्दती,दळणवळ्ण विषयी आणि इतर संबधित मानके विकसीत करणे.
पारंपारिक उत्पादन व त्यावरील काही प्रक्रिय सेंद्रिय् म्हणून प्रमाणित करता येतील तेव्हा त्या उत्पादनाचे स्थान (शेती /उद्योग ) प्रमाणीकरण संस्थेच्या वार्षिक निरिक्षणाखाली असेल,उत्पादन व प्रक्रिया मूळ मानकांच्या अनुरुप असतील
सेंद्रिय उत्पादनासाठी आवश्यक माहिती
    धान्य,भाजीपाला,फळे आपल्या आहाराचा अविभाज्य भाग आहेत.रासायनिक खतांचा अमर्यादित वापर, सोबतीला किटकनाशक, बुरशीनाशकांचे फवारे आज धान्य, भाजीपाला फळे यांच्या अधिक उत्पादनासाठी दिल्या जातात. या किटकनाशकांचा /बुरशीनाशकांचा विषारी अंश अन्नाद्वारे आपल्या शरीरात येत आहे त्यामूळे आपले आरोग्य धोक्यात आले आहे. शेतकरी या विषारी औषधाचा वापर करीत असल्याने त्यांच्या आरोग्यावर त्याचा सरळ परिणाम होतो. निसर्गाचे संतुलन ही रसायने बिघडवत आहेत. कीड किंवा रोग नष्ट करणारे किडे,जीवाणू मारले जात आहेत, शिवाय या रसायनांच्या सरळ वापराने कीड व रोग पसरविणारे जीवाणू अधिक शक्तीशाली होत आहेत.
    शेतीतील लहान जमीनीच्या तुकड्यावर भाजीपाला तयार केला जातो व तो विकून सतत पैसे कमावले जातात बहुधा शेतीतील जास्त काम महिला शेतक-याचे असते.आज सेंद्रिय उत्पादनाची मागणी आपल्या देशात आणि विदेशात वाढत आहे.कारण रासायनिक खते आणि कीटकनाशके व बुरशीनाशकांमुळे होणारे वाईट पारिणाम ग्राहकांला माहिती झाले आहेत.सेंद्रिय उत्पादनाची किमंत आज त्याची मागणी व पुरवठ बघून ठरवावी लागले.सेंद्रिय पध्दतीने धान्य,फळॆ,भाजीपाला तयार करायला पाहिजे.
     सेंद्रिय उत्पादन करुन शेतकरी शहरातील ग्राहकांच्या संघाला पाठवायाला तयार व्हायला पाहिजे.मिश्न पीक पध्दती वापरुन सेंद्रिय उत्पादने तयार केल्यास आपण सेंद्रिय उत्पादनावर येणारे किड व रोग ह्याचे नियंत्रण करु शकतो. मिश्न पिक घेतल्यामुळे विविध उत्पादने येणार म्हण्जे आपली उत्पादन विषयीची जोखीम कमी होईल.

जमीनीची उत्पादन क्षमता
    जमीन सेंद्रिय उत्पादन प्रक्रियेत महत्त्वाचे अंग आहे, जमीनीतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण झाडांना लागंणा-या अन्न क्षारांचे प्रमाण आणि जमिनीचा पोत व रचना ह्या सर्वाचा उत्पादनावर परिणाम होतो, जमिनीतील असंख्य जिवाणू व नमुद केलेले जमिनीचे घटक मिळून सेंद्रिय उत्पादन वाढीस लावण्यास कारण असतात.
    सेंद्रिय उत्पादन तयार करायला नक्की कुठल्या प्रकारची जमिन लागेल हे सांगणे अवघड आहे कारण प्रत्येक जमिन ही वेगवेगळ्या प्रकारची असते.ज्या जमिनीत पोयटा चे प्रमाण मर्यादेपर्यत असते व सेंद्रिय पदार्थ भरपूर प्रमाणात असून पाण्याचा निचारा करण्याचा गुण असतो अशी जमीन उत्पादनाला योग्य असते.
सेंद्रिय खतांचा ,नैसर्गिक मिनरल फर्टिलायझर व जमीन संवर्धनाचे उपाय योजून जमीन उत्पादनासाठी योग्य करता येते.ज्या जमीनीत वाळूचे प्रमाण जास्त आहे,त्या अधिक प्रमाणात सेंद्रिय खते टाकावी लागतील व पाणी जास्त द्यावे लागेल. सेंद्रिय खताचा पुरवठा,सेंद्रिय पदार्थाचा पुरवठा ,वेगवेगळ्या मार्गाने जमिनीत  करता येतो. उदा. शेणखत कंपोस्ट खत ,हिरवळीचे खत वगैरे

सेंद्रिय पदार्थामुळे खालील फायदे होतात 
* जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते.
    ०.५ % ते १.० % सेंद्रिय पदार्थ जमिनीला दिल्यास पाणी धरुन ठेवण्याची जमिनीची शक्ती दुप्पट होते. एक एकरात ८ टन शेणखत (कुजलेले) घातल्यास त्या जमिनीत सेंद्रिय पदार्थ ०.५ % ने वाढतात. जमिनीतील सेंद्रिय खतांचा वापर झाडांद्वारे केला जातो.जमिनीची धुप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहिसे होत जातात.वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरविल्यास जमिनीची उत्पादन क्षमता वाढते व पाणी धरुन ठेवण्याची क्षमताही वाढत.
* नत्र पुरवठा - जमिनीत सेंद्रिय खतं टाकल्यास नत्राचा पुरवठा होतो हे नत्र झाडांच्या वेगवेगळ्या अवस्थेत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात.शेणखताव्यतिरिक्त कोंबड्यांपासून मिळणारे खत (कॊंबडीची विष्ठा ) रेशिम उद्योगातील टाकावू पदार्थ नत्राचा अधिक पुरवठा करतात.
* स्फुरद व पालाश - सेंद्रिय खतंमुळे स्फुरद व पालाश झाडांना विविध अवस्थेत उपलब्ध होऊन झाडांमध्ये मुळांच्याद्वारे शोषली जातात.
* जमिनीचा सामू - सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमिन आम्ल, विम्ल व क्षारयुक्त होत नाही.
* कँशन अँक्शचेंज कँपोसिटी (CEC) - कँशन एक्सचेंज कँपोसिटी म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती.सेंद्रिय खतांमुळे कँशन अँक्शचेंज कँपोसिटी २० ते ३० % ने वाढते .त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येते.व झाडांना संतुलीत पोषकद्रव्ये मिळतात.
* कर्बाचा पुरवठा -  कर्ब किवा कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जिवाणूंना त्याचा उपयोग त्यांच्या वाढीसाठी होतो.नंतर हे जिवाणू जमीनीतून अन्नद्रव्य झाडांना उपलब्ध करुन देतात.
* सेंद्रिय खतांचा परिणाम - सेंद्रिय खतांमुळे मातीवर सावली होऊन तापमान वाढत नाही सेंद्रिय पदार्थ माती घट्ट धरुन ठेवतात.उष्ण तापमानात जमिनीला थंड करणे व कमी तापमानात जमिन गरम ठेवणे सेंद्रिय खतामुळे शक्य आहे.
सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील असंख्य जिवाणूंची वाढ होते.त्यात रोग निर्माण करणारे जीवाणूपण वाढीस लागू शकतात .अशा वेळी ट्रायकोडरमा नावाचे जीवाणू जमिनीत सोडल्यास रोग निर्माण करणा-या जिवाणूंचा नाश होऊ शकतो.

जमिनीतील अन्नद्रव्य नियमन

    रासायनिक खतांतून अन्नद्रव्यांचा पुरवठा केल्यास जमिनीला काही महत्त्वाचे घटक पुरविले जातात. वेगवेगळ्या झाडांची अन्नद्रव्याची गरज वेगवेगळी असते.त्याप्रमाणात शेणखत,कंपोस्ट,गांडूळ खत,कोंबड्याची विष्ठा, रेशीम उत्पादनातील टाकाऊ घटक, डुकरांच्या विष्ठेपासून केलेले खत,जीवाणू पासून केलेले खत आच्छादन देण्यासाठी वापरली जाणारी झाडे ,हिरवळीचे खत आणि स्फुरद व कँल्शीयम नैसर्गिकरित्या पुरविणारे दगड ह्याचा उपयोग करावा.

कीड व रोग नियमन
   कीड व रोग नियंत्रण हा एक महत्त्वाचा विषय आहे व अत्यंत काळजीपूर्वक त्याचे नियमन सेंद्रिय कूषी पध्दतीत करावे लागते भाजीपाल्यात कीड व रोगाचे प्रमाण जास्त असल्याने उत्पादनात बरीच घट येऊ शकते.कीड व रोगाचे नियंत्रण खालील तत्वे लक्षात घेऊन करावे.
*  कीड व रोग प्रतिकारक वाणांचा उपयोग - संकरित वाणापेक्षा गावठी वाण जास्त प्रमाणात कीड /रोग प्रतिकारक असतात .त्यामुळे सेंद्रिय शेतीसाठी गावठी वाणांचा प्राधान्याने उपयोग करावा .सेंद्रिय शेतीसाठी सुधारित जाताही वापरता येतात मात्र संकरित जाती वापरतांना त्यांची कीड / रोग प्रतिकार शक्ती लक्षात घ्यावी.
*  सशक्त बियाणे वापरावे - सशक्त बियाणे वापरल्याने एक सारखी व सशक्त रोपे मिळतात.तथापि वापरापूर्वी बियाणांची उगवण क्षमता तपासून पहावी.
*  उंच नर्सरी वाफे ४० मेश जाळीने झाकावी - पाढ-या माशीचा बंदोबस्त ४० मेश जाळीने होतो पाढरीमाशी अनेक विषाणूंना पीकावर घेऊन येते.एक जरी माशी आली तरी पिकांवर कीड / रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.टोमँटो नर्सरीतील झाडे जाळीने झाकणे महत्त्वाचे आहे;त्यामुळे पानाचा चुरडा मुरडा (कोकडा) रोग येत नाही.
*  नर्सरीतील जमिनीला सूर्यप्रकाश दाखविणे  - सुर्यप्रकाशाच्या उष्णतेने बुरशीजन्य रोग नाहीसे.तेव्हा नर्सरीतील जमीन पेरणीपूर्वी कडक उन्हात काही दिवस तापू द्यावी .त्यानंतर काळ्या रंगाचे पाँलीथीन पसरवून त्यावर २ ते २.५ से.मी. उंचीचा मातीचा थर द्यावा त्यावर दुसरे पारदर्शक पाँलीथीन पसरवावे व जमीन उन्हात २ ते ३ दिवस तापवावी नंतर ही माती नर्सरीत बियाणॆ पेरण्यास वापरावी.
*  ट्रायकोडरमा - ट्रायकोडरमा व्हीरीडे नावाची बुरशी बियाण्यास लावल्यास रोगजन्य जीवाणू बियाण्यावर येत नाहीत.ट्रायकोडरमा रोगजन्य बुरशीला नष्ट करते.
   ट्रायकोडरमा खालील प्रमाणात वापरवे.
   बियाण्यांसाठी ५ ग्रँम/किलो बियाणे,
   जमीनीत – १ किलो /२५ किलो शेणखतासोबत.
   ट्रायकोडरमाचे प्रमाण वाढविता येईल. ट्रायकोडरमामुळे डँपीगं आँफ व काँलर राँट हे रोग नियंत्रणात येतात.
*  सापळा पिके - कीटकांचे नियंत्रण करण्यास सापळा पिकांचा उपयोग होतो .सापळा पिकांवर काही प्रकारचे कीटक आकर्षित होतात .ज्याचे नियंत्रण काही झाडांच्या अर्काचा फवारा मारून करता येते .उदा,आँफ्रिकन उंच झेडू हे सापळा पीक टोमँटो मधे लावल्यास कीटक टोमँटो पेक्षा झेंडुवर आपली अंडी देतात व अशा प्रकारे  टोमँटो पिकांचे संरक्षण होते.
   मोठ्या बियांचे मोहरी झाड (याची पाने ही मोठी असतात ) सापळीपीक म्हणून कोबीत लावल्यास डायमंड ब्लँक माँथ कीटकांचे नियंत्रण होते या कीडीची मोहरीवर अंडी टाकली जातात. ही अंडी ४ % निंबोळी बियाणॆ अर्क फवारून नष्ट करता येतात.
*  नियमीत (कीड /रोग इतर शत्रूंपासून ) सावध राहणे.
   नियमीत लक्ष ठेवल्यास्रोग व कीटकापासून होणारे मॊटे नुकसान टाळता येते कारण जितक्या लवकर लक्षात येईल तितक्या लवकर उपाय योजना सुरु होऊ शकते.अंडी व अळ्या हाताने उचलून नष्ट करता येतात.झाडांचे रोगट भाग नाहीसे करणॆ ,ट्रायकोडरमा मिश्नीत पाणी जमीनीवरून सोड्णॆ ,ब्लिचींग पावडर मिसळून जमीनीवर सोडणे  हे उपाय बुरशीजन्य व अन्य रोग नियंत्रणासाठी करता येतात.
*  जाळणे  - रोग व कीड लागलेली झाडे मुळासकट काढून जाळून टाकावीत.
*  पाण्याचे नियमन - जमिनीतील पाण्याचे प्रमाण रोग निर्माण करायला कारणीभूत असते.अती पाण्याच्य वापराने जास्त रोग होतात .या शिवाय जमीन कोरडी असली तरीही काही रोग होऊ शकतात.उदा.पावडरी मिल्ड्यु (काकडीवर ) यासाठी पाण्याचा योग्य प्रमाणात उपयोग करावा.
*  वनस्पतीजन्य अर्क - निबॊंणीच्या बियांचा अर्क,पानांचा अर्क,कँलोट्राँपीस पानांचाअर्क,बोगनव्हेल पानांचा अर्क,याचे फवारे देउन कीटकांच्या अळ्यांचा बंदोबस्त होऊ शकतो.
*  वेगवेगळी पिके एकाच जागी लावणे - ह्या पध्दतीमुळे कीड व रोग नियंत्रण कीटक वाढीस लागून रोगाचा बंदोबस्त होऊ शकतो काही झाडांच्या वासाने कीड /रोग नियंत्रण हॊऊ शकते.
*  पिकांची फेरपालट - यामुळे रोग निर्माण करण्या-या जीवाणूंचे नियंत्रण होते .ज्या झाडावर एखादा रोग येत नाही ती झाडे शेतात असल्याने त्या रोगाचे उच्चाटन होण्यास मदत होते उदा.सोल्यानेसीज प्रकारचा भाजीपाला सारखा एकाच जागी लावल्यास रोग निर्माण करणा-या जीवाणूंना वाढ होण्यास मदत होते म्हणू न हा भाजीपाला एकाच जागी वारंवार लावू नये.
*  पिकाच्या फेरपालटीचे नियम - एकाच पीक पुन्हा त्याच जागी एक वर्षापेक्षा जास्त वेळ लावु नये.२५ % शेताचा भाग द्विदल पिकासाठी असावा.तोच तो भाजीपाला एकाच जागी सतत लावू नये.कोबी व त्याच प्रकारची इतर झाडे लावली असल्यास (३ वर्षातून एक वेळेस ) त्या जमिनीत कोबी लावू नये.काकडी व तत्सम पीके ४ वर्षातून एकदाच त्या जमीनीत लावावी .काकडी व तत्सम पिकानंतर सोल्यानेसी किवा कुकुरबीटेसीई पिके लावु नये.सोलँनेसीई झाडे(टोमँटो,वांगी,मिरची,बटाटा) ४ वर्षातून एकदाच एका जागी लावाव्यात धान्य पिके वर्षातुन एकदा तरी फेरपालट करु लावावी.मनुष्याच्या विष्टेचा उपयोग करू नये. नैसर्गिकरित्या आढळणारे पिकांचे अन्नद्रव्य असलेले दगड वापरावे. रासायनिक खतांचा वापर अजिबात करु नये.
*  कीड /रोग नियंत्रक - पारंपारिक पध्दतीचा कीड / रोग नियंत्रणासाठी उपयोग करावा जसे वनस्पतीचे अर्क,भौतिक कीडनियंत्रके,जैविक कीड नियंत्रके
*  वाढ नियंत्रके - जी वाढ नियंत्रके वनस्पतीपासून केलेली आहेत ती वापरावी.
*  प्रदुषण नियंत्रण - प्रदुषण करणारे पादार्थ वापरु नये.(प्लास्टिक )जमिन आणि पाण्याचे संवर्धन,जंगलातून मिळणारे उपयोगी पदार्थ,जमीनीची नैसर्गिकता याला महत्त्व द्यावे.

Source : http://www.sendriyashethi.net

गांडूळखत निर्मिती

गांडूळखत निर्मिती



गांडूळखत निर्मितीचे तंत्र व शेतीसाठी त्याचे फायदे 
जमिनीचा सुपीक थर होण्यासाठी गांडुळाचे महत्त्वाचे कार्य आहे. गांडुळाच्या शरीरामध्ये प्रोटोलायटीकसेल्युलो लाटकीक आणि लिग्नो लायटीक एन्झाईम्स असतात . या एन्झाईम्समुळे सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन साध्या सेंद्रिय पदार्थांतील सहजीवी जीवाणू व अॅक्टीनोमायसीटीसबुरशीमुळे लिगनीनयुक्त सहसा लवकर न कुजणार्‍या पदार्थांचे अन्नद्रवीकरण होते.
गांडूळ ह्या प्राण्याचा अॅनिलिडा समूहात व ओलिगोचीटा वर्गात समावेश होतो. आपल्या शेतीसाठी गांडूळ नवीन नाहीत. मराठीत गांडूळ,, दानवे वाळेशिदोड अथवा केंचवे या नावाने ओळखल्या जाणार्‍या या प्राण्याला इंग्रजीत 'अर्थवर्मअसे नाव आहे. शेतीमधील विषारी किटकनाशकांच्या व रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादन खर्चात वाढ तर होतेच परंतु पर्यावरणावर दुष्परिणामही होतो. त्यामुळे जगातील बरेच देश गांडूळांचा वापर करीत आहेत.
आज ठिकठिकाणी चाललेल्या प्रयोगाद्वारे निसर्गशेतीची संकल्पना आज काही प्रमाणात रुजत चालली आहे. त्यात गांडूळ शेतीचा वापर (गांडूळांच्या वापर करून) पालापाचोळाशेतातील काडी कचरा व जनावरांचे मलमुत्र इ. सेंद्रिय पदार्थाचा वापर करून गांडूळखत बागेतशेतातअथवा कोणत्याही जागेत तयार करू शकतो. त्यासाठी गांडूळांची शास्त्रशुद्ध माहिती असणे गरजेचे आहे.
गांडूळ हा नाजूक गुळगुळीतलवचीक शरीर असलेला भूचर असून तो २ इंचापासून दोन फुटापर्यंत लांब असून त्याचे वजन ०.५ ग्रॅम पासून १० ग्रॅमपर्यंत असून शकते. हा रंगाने तांबूसतपकिरीलालसर किंवा पांढरट असतो. त्याला हवे ते वातावरण मिळाले कीतो अविश्रांत कार्य करीत असतो. शेण हे गांडूळांचे आवडते खाद्य असून शेणाबरोबर शेतातील काडीकचरा अथवा पालापाचोळा थोडी प्रक्रिया करून दिला तर ते गांडूळांचे उत्तम खाद्य ठरते.
जगात गांडूळांच्या ३०० हून अधिक जाती असल्या तरी त्यांचे मुख्यत: दोन गटांमध्ये वर्गीकरण केले जाते.
१) जमिनीच्या पृष्ठभागावर कचर्‍यात राहून कचरा खाणारी गांडुळेह्यांचा वाढीचा व उत्पत्तीचा वेग जास्त असल्यामुळे यांचा वापर मुख्यत: गांडूळखत तयार करण्यासाठी केला जातो. ह्या प्रकारामध्ये मुखत: आयसोनीया फीटीडायुड्रीलस युजेनियापेरीनोक्सीएक्झोव्हेटसफेरीटीमा इलोंगेटा इ. समावेश आहे.
२) दुसर्‍या प्रकराची गांडुळे जमिनीत खोलवर बिळे तयार करतात. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. ही गांडुळे जास्त प्रमाणात माती खातात व सेंद्रिय पदार्थ खाण्याचे प्रमाण फार कमी असते. जमिनीमध्ये योग्य वातावरण निर्माण केल्यास ही गांडूळे शेतजमिनीत आपोआप तयार होतात.
अर्धवट कुजलेला शेतातील / जैविक विघटनशील काडीकचरापालापाचोळाटाकाऊ सेंद्रिय पदार्थ तसेच कुजलेले शेण इत्यादी पदार्थ कुजविण्यासाठी गांडुळांचा उपयोग केला असता ते पदार्थांचे तुकडे खाऊन चर्वन करतात. त्यांचे पचन करून कणीदार कातीच्या स्वरूपात शरीराबाहेर टाकतातत्यालाच 'गांडुळखतअसे म्हणतात. या खतामध्ये गांडुळांची लहान पिल्ले आणि अंडकोश यांचाही समावेश असतो. 
गांडूळ खत तयार करण्यासाठी पुढील सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा.
१) पिकांचे अवशेष : धसकटेपेंढाताटेकोंडापालापाचोळा आणि गवत.
२) जनावरांपासून मिळणारी उप उत्पादीते : शेणमूत्रशेळ्या आणि मेंढ्यांची लीदकोंबड्यांची विष्ठाजनावरांची हाडेकाळती इत्यादी.
३) फळझाडे आणि वनझाडांचा पालापाचोळा
४) हिरवळीची खते : तागधैंचागिरीपुष्पशेतीतील तण इ.
५) घरातील केरकचरा : उदा. भाज्यांचे अवशेषफळांच्या सालीशिळे अन्न इत्यादी.
६) घरातील सांडपाणी.
गांडुळांची पैदास : गांडुळांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी १लांब १ मिटर रुंद आणि ३० सें. मी. जाडीचा सावकाश कुजणार्‍या सेंद्रिय पदार्थाचा म्हणजे लाकडाचा भुसाभाताचे तूसनारळाचा काथ्यागवत अथवा असाचे पाचत यांचा थर द्यावा . त्यानंतर ३ सें. मी. जाडीचा कुजलेले शेणखत आणि बागेतील मातीच्या मिश्रणाचा थर द्यावा. प्रत्येक थरावर पाणी शिंपडून सर्व थर पाण्याने भिजवून घ्यावेत. वरच्या थरावर पूर्ण वाढ झालेली २००० गांडुळे सोडावीतत्यावर गांडुळांच्या खाद्याचा १५ सें. मी. जाडीचा थर पसरावा. या खाद्यामध्ये १० भाग भाजीपाल्यांचे अवशेष अथवा कुजलेल्या पालापाचोळ्याचे असे मिश्रण करावे . हे मिश्रण गांडूळांच्या वाढीस पोषक खाद्य ठरतेया थरावर ५० % पाणी शिंपडावे. सूर्यप्रकाश आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी ही खोकी सावलीत ठेवावीत. शेवट्या थरावर ओला बारदाना अंथरावा. उंदीरघूसमुंग्यागोम,बेडूक यांपासून गांडूळांचे संरक्षण करावे.
८ ते १० दिवसानंतर खाद्याच्या पृष्ठभागावर लहान ढिगांच्या स्वरूपात गांडूळांची कणीदार कात दिसून येईल. ही कात ब्रशच्या सहाय्याने काढून घ्यावी. खाद्य जसजसे कमी होत जाईल तसतसे वरच्या थरावर खाद्य घालत जावे. कात काढल्यावर त्यामध्ये गांडुळे दिसली तर ती पुन्हा खोक्यात सोडावित. साधारणत : आयसीनीया फिटीडायुड्रीलस युजेनिय या जातीच्या एका जोडीपासून तीन महिन्यानंतर ६० गांडूळांची निर्मिती होते. या गांडूळांचा उपयोग सेंद्रिय खत निर्मितीसाठी करावा. ६ महिन्यानंतर खोक्यातील सर्व थर बदलून वरीलप्रमाणे पुन्हा गांडूळांची निर्मिती करावी.
गांडूळखत करण्याच्या पद्धती : गांडूळखत ढीग आणि खड्डा या दोन्ही पद्धतींनी तयार करता येते. मात्र दोन्ही पद्धतींमध्ये कृत्रिम सावलीची गरज आहे. सूर्यप्रकाश व पावसापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी छप्पराची शेड तयार करावी. या शेडची लांबी दोन ढिगांसती ४.२५ मीटर तर चार ढिगांसाठी ७.५० मीटर असावी. निवारा शेडच्या दोन्ही बाजू उताराच्या असाव्यात. बाजूच्या खांबांची उंची १.२५ ते १.५० मीटर आणि मधल्या खांबांची उंची २.२५ ते २.५० मीटर ठेवावी. छप्परासाठी गवतभाताचा पेंढानारळाची झापेकपाशी अथवा तुरीच्या काड्याज्वारीची ताटेजाड प्लॅस्टिकचा कागद किंवा सिमेंट अथवा लोखंडी पत्र्यांचा उपयोग करावा. गांडूळखत तयार करण्यासाठी गांडूळांची योग्य जात निवडावी.
ढीग पद्धत : ढीग पद्धतीने गांडूळखत तयार करण्यासाठी साधारणत: २. ५ ते ३.० मी. लांबीचे आणि ९० सें.मी. रूंदीचे ढीग तयार करावेत. प्रथम जमीन पाणी टाकून ओली करून घ्यावी. ढिगाच्या तळाशी नारळाचा काथ्यागवतभाताचे तूस यासारख्या लवकर न कुजणार्‍या पदार्थांचा ३ ते ५ सें. मी. जाडीचा थर रचावात्यावर पुरेशे पाणी शिंपडून ओला करावा. या थरावर ३ ते ५ सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा,कंपोस्टचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. या थराचा उपयोग गांडूळांचे तात्पुरते निवासस्थान म्हणून होतो. या थरावर पूर्ण वाढलेली गांडुळे हळूवारपणे सोडावीत. साधारणत: १०० कि. ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळखत तयार करण्यासाठी ७००० प्रौढ गांडुळे सोडावीत.
दुसर्‍या थरावर पिकांचे अवशेषजनावरांचे मलमूत्रधान्याचा कोंडाशेतातील तणगिरीपुष्प शेवरी या द्विदल हिरवळीच्या झाडांची पानेमासोळी खतकोंबड्यांची विष्ठा इत्यादींचा वापर करावा. या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिक चांगले असते. त्यातील कर्ब: नत्रांचे गुणोत्तर ३० ते ४० च्या दरम्यान असावे. संपूर्ण ढिगाची उंची ६० पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घ्यावी. कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थामध्ये ४० ते ५० % पाणी असावे. त्यासाठी ढिगावर गोणपाटाचे आच्छादन देऊन झारीने दररोज पाणी फवारावे. ढिगातील सेंद्रिय पदार्थांचे तापमान २५ ते ३० सेल्सिअस अंशाच्या दरम्यान राहील याची काळजी घ्यावी.
खड्डा पद्धत : खड्डा पद्धतीने गांडूळखत तयार करण्यासाठी छपराच्या अथवा झाडांच्या दाट सावलीत खड्डे तयार करावेत. खड्ड्यांची लांबी ३ मीटररुंदी २ मीटर आणि खोली ६० सें. मी. ठेवावी. खड्ड्यांच्या तळाशी नारळाचा काथ्यागवतभाताचे तूसगव्हाचा कोंडा ३ ते ५ सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचाकंपोस्ट खताचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. दोन्ही थर पाण्याने पूर्ण ओले करून त्यावर साधारणत: १०० कि. ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळखत तयार करण्यासाठी ७००० पौढ गांडुळे सोडवीत. त्यावर अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा जास्तीत - जास्त ५० सें.मी. जाडीचा थर रचावा. त्यावर गोणपाटाचे आच्छादन देऊन नेहमी ते ओले ठेवावे. गांडुळांच्या वाढीसाठी खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थांमध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे. त्यासाठी सेंद्रिय पदार्थांचे थर घट्ट झाल्यास हाताने सैल करावेत. त्यामुळे खड्ड्यातील तपमाना नियंत्रित राहील. अशाप्रकारे झालेल्या गांडूळखताच्या शंकू आकृती ढीग करावा. ढिगातील वरच्या भागातील खत वेगळे करून सावलीतवाळूवून चाळून घ्यावे. चाळल्यानंतर वेगळी झालेली गांडुळेत्यांनी पिल्ले व अंडकोष यांचा पुन्हा गांडूळखत तयार करण्यासाठी वापर करावा.
खत तयार होण्यास लागणारा कालावधी 
गांडुळांचा वापर करून खत तयार होण्यास दिड महिन्याचा कालावधी लागतो. लिग्निनचे प्रमाण जास्त असणाऱ्या गवत आणि काजूची पाने यासारख्या सेंद्रिय पदार्थांपासून गांडूळखत तयार होण्यात सर्वाधिक तर घरातील अवशेषांपासून खत तयार होण्यास सर्वांत कमी वेळ लागतो.
गांडूळ खतांत असणारे महत्त्वाचे घटक - 
१) गांडूळखतामध्ये मोनोसॅकॅराईडसडायसॅकॅराईडस व पॉलीसॅकॅराईडस ही पिष्टमय पदार्थअमिनोआम्ल व साधी प्रथिनेस्निग्ध पदार्थलिग्नीन,न्युक्लीक ऑम्ल व ह्युमस ही कार्बनी रसायन जास्त प्रमाणात असतात.
२) गांडूळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण ४० ते ५० % असते. ह्युमसमध्ये ४० ते ५७% कार्बन४ ते ८% हायड्रोजन३३ ते ५४% ऑक्सिजन०.७ ते ५ % सल्फर व २ ते ५% नत्र असते.
३) गांडुळखतामध्ये १.८ % नत्र५७% स्फुरद१.०% पालाश तसेच मँगनीजझींककॉपरमंगललोहबोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात असतात.
गांडूळ खतांचे शेतीसाठी फायदे :
१) गांडुळांमुळे जमिनीचा पोत सुधारतो.
२) मातीच्या कणांचा रचणेत उपयुक्त बदल घडविला जातो.
३) गांडुळांची विष्ठा म्हणजे एक उत्तम प्रकारचे खत आहे याला 'ह्युमसम्हणतात. यातून झाडाच्या वाढीसाठी लागणारे नायट्रोजनफॉस्फरस,पोटॅशियम व बाकीचे सूक्ष्म अन्नद्रव्ये झाडांना सहजासहजी व ताबडतोब उपलब्ध होतात.
४) मुळ्या अथवा झाडांना इज न होता जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते.
५) जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
६) जमिनीची घूप कमी होते.
७) पाण्याचे बाष्पीभवन फारच कमी होते.
८) जमिनीचा सामू योग्य पातळीत राखला जातो.
९) गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवितात.
१०) उपयुक्त जिवाणूंच्या संख्येमध्ये भरमसाठ वाढ होऊन वरखते आणि पाण्याच्या खर्चात बचत होते.
११) झाडांची निरोगी वाढ होऊन किडींना व रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होते.
१२ ) फळांमध्ये टिकावूपणा व चव येऊन त्यांना पक्वता लवकर येण्याचे प्रमाण वाढते. अशाप्रकारे गांडूळ नापीक जमीनसुद्धा सुपीक बनविण्याचे कार्य करते.
गांडूळ खतांचे इतर उपयोग:
१) पक्षीकोंबड्याजनावरे आणि मासे यांची विष्ठ अवशेष उत्तम प्रतीचे खाद्य म्हणून गांडूळ वापरतात.
२) गांडूळापासून किंमती अॅमिनो अॅसिडसएंझाईमस आणि मानवासाठी औषधे तयार करता येतात.
३) पावडरलिपस्टिकमलमे यासारखी किंमती प्रसाधने तयार करण्यासाठी गांडुळाचा वापर केला जातो.
४) परदेशात पिझाआम्लेटसॅलड यासारख्या वस्तूंमध्ये प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी गांडूळांचा उपयोग करतात.

सेंद्रिय खत तयार करण्याची पद्धत

सेंद्रिय खत तयार करण्याची पद्धत

शेतातील मातीत पुरेसा सेंद्रिय कर्ब असेल तर ती चांगले उत्पादन देईल व पिकांसाठी अनावश्यक खर्च कमी केला की, मूळ नफ्यात वाढ होईल, हा शाश्‍वत शेतीचा मूलमंत्र आहे. जमिनीच्या पोताचा विचार न करता बर्‍याच वेळा फसव्या जाहिरातीकडे आकर्षित होऊन चुकीच्या महागड्या बियाण्यांची लागवड करण्यात येते. कम्पोस्ट, शेणखत इत्यादींचा वापर न करताच रासायनिक खतांच्या आणि रासायनिक कीडनाशकांच्या वापरामुळे जमिनीत काम करणारे जिवाणू कमी झाले आहेत. म्हणून जमीन सजीव करण्याकरिता जिवाणू खते, कम्पोस्ट, गांडूळ खते, गांडूळे, नॅडेप पिकांचा फेरपालट आणि मिश्रपीक पद्धतीचा अवलंब करता येईल.
सेंद्रिय खते तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या याप्रमाणे :
गांडूळ खत
शेतातील काडीकचरा, गोठ्यातील शेण-मलमूत्र यांचा वापर गांडूळासाठी खाद्य म्हणून करून यासाठी शक्यतो गोठ्याजवळ पाणी सहज मिळू शकेल अशी जागा निवडावी. धुम्मस करून किंवा आवश्यकतेप्रमाणे सिमेंट, रेतीचे प्लॅस्टर करून टणक करावी, जेणेकरून गाडूळे जमिनीत जाणार नाहीत. तसेच या जागेभोवती विटांची एक फूट उंचीची एका विटेची भिंत बांधून, बांबू पर्‍हाट्या, तुर्‍हाट्यांचा उपयोग करून सावली तयार करावी. या जागी शेणकाडी, कचर्‍याचे मिश्रण करून चार फूट रुंद व दीड फूट उंचीचे व आवश्यकतेनुसार लांबीचे बेड तयार करावेत. बेडवर ‘आसेनिया फिटीडा’ जातीचे गांडूळ सोडून जुने पोते किंवा कंता वरून झाकावे. दररोज बेडवर हलकेसे पाणी शिंपडून ओलसर ठेवावा. गांडूळांच्या संख्येनुसार सेंद्रिय पदार्थांचे रूपांतर साधारण ४५ दिवसांत चहापत्तीसारख्या रवेदार गांडूळ खतात होते. यानंतर बेडवर पाणी देणे बंद करून, गांडूळ तळाशी रास करून ते जमा करावे. त्यामुळे गांडूळे तळाशी जमा होतील. वर असलेले गांडूळ हलक्या हाताने जमा करून शेतीसाठी वापरावे. तळाशी राहिलेल्या गांडूळांचा नवीन बेडसाठी उपयोग करावा. गांडूळ खत वापरामुळे जमिनीचा पोत सुधारतो. त्याचबरोबर पिकांना व जमिनीतील जिवाणूंना संतुलित प्रमाणात सर्व अन्नद्रव्ये व एन्झाईमस उपलब्ध होऊन पिकाच्या उत्पादनात व गुणवत्तेमध्ये वाढ होते. पक्षी, साप, उंदीर, बेडूक, मुंग्या, कोंबड्या इत्यादी शत्रूंपासून गांडूळांचे संरक्षण करावे.
नॅडेप खत
सेंद्रिय खत तयार करण्याची विकसित पद्धत आहे. साधारणतः १०० किलो शेणासोबत शेतातील काडी, कचरा, पालापाचोळा, तण व माती इत्यादींचा वापर करून साधारणतः चार महिन्यांत ३ टन सेंद्रिय खत तयार होते. जमिनीवर विटा-सिमेंटचे टाके बांधून खत तयार करता येते.
कम्पोस्ट खत
नेहमीच्या पद्धतीत जमिनीवर ढिग करून ठेवलेले शेण व काडीकचरा सतत ऊन-पावसात राहत असल्यामुळे त्यातील आवश्यक अन्नघटक मोठ्या प्रमाणात हवेत व पाण्यासोबत निघून जातात. त्याऐवजी हाच शेण-काडीकचरा खड्डा करून त्या खड्ड्यात टाकल्यास जास्तीत जास्त एक मीटरपर्यंत खोलीच्या दर्जाचे सेंद्रिय खत तयार होते. या पद्धतीत नेहमीच्या शेणखतासोबत येणार्‍या तणांचाही बंदोबस्त होतो.
पर्‍हाट्यापासून कम्पोस्ट बनविण्याची पद्धत
नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने ही नवीन पद्धत विकसित केली आहे. यामध्ये १० मीटर लांब, २ मीटर रुंद, १ मीटर खोल खड्डा करून त्यात दोन हेक्टर क्षेत्रातील पर्‍हाट्यावर ज्वारीची फणवटे व सोयाबीनचे काड इतर मऊ सेंद्रिय पदार्थ पर्‍हाट्यातील रिकामी जागा भरण्यासाठी टाकावे. खड्डा चार थरावर हे द्रावण शिंपडावे व खड्डा मातीने झाकून घ्यावा. तयार झालेले खत गांडूळ खताप्रमाणे वापरता येते.
इफको, फास्फो, सल्फो, नायट्रो (पीएसएन) कम्पोस्ट आवश्यक सामग्री
* ताजा शेण २५० किलो
* काडीकचरा २५० किलो
* माती १५ किलो, युरिया ५.५ किलो
* राक फॉस्फेट किंवा डीएपी १४३ किलो किंवा २५ किलो, जिप्सम १०० किलो
* पीएसबी कल्चर २१ किलो
* जिथे ऊन पडते अशा ठिकाणी ३ मीटर लांब १.५ मीटर रुंद व १ मीटर खोल असा खड्डा बनवावा.
* पहिला थर ः १५ किलो काडीकचरा आणि १५ किलो शेण एकसारखे काडीकचर्‍यावर पसरावा.
* दुसरा थर ः ३३० ग्रॅम युरिया, १ लिटर पाणी व शेणात मिसळून पातळ करून शिंपडावा.
* तिसरा थर ः ८.६ किलो रॉक फॉस्फेट किंवा २ किलो डीएपी शेणासोबत मिसळून पातळ करून शिंपडावा.
* चौथा थर ः ६.२५ किलो जिप्सम, शेण व पाण्यासोबत मिसळून शिंपडावा.
* पाचवा थर ः १.५ किलो बारीक खत माती टाकावी. वरीलप्रमाणे असे १६ थर बनवावेत.
* शेवटी माती आणि शेणाच्या मिश्रणाचा लेप लावावा व यावर प्लॅस्टिक सीटने झाकावे.
* प्रत्येक ३-४ आठवड्यांची एक पलटणी द्यावी.
* खड्ड्यामध्ये ५०-६० टक्के आर्द्रता ठेवावी. यासाठी बांबूंनी पाच ठिकाणी छिद्रे करावीत. यामधून प्रत्येक दोन आठवड्यांनी पाणी घालावे.
* ११० दिवसांत उत्तम प्रतीचे ५५० किलो कम्पोस्ट तयार होते. खत थंड झाल्यावर यामध्ये पीएसबी कल्चर मिसळावे. अशा प्रकारे तयार झालेले कम्पोस्ट १ टन प्रति एकर याप्रमाणे वापरावे.
* पीएसएन कम्पोस्टमध्ये १.९० ते २.५० नत्र, ३.०५ ते ४.५ टक्के स्फूरदच्या व्यतिरिक्त सल्फर कॅल्शियम व अन्य सूक्ष्म पोषक तत्त्व असतात.

सेंद्रिय शेती

अजून आपल्याकडे स्वास्थ्य व आरोग्य विषयाबाबतची जागरूकता म्हणावी इतकी आलेली दिसत नाही, त्यामुळे स्थानिक स्तरावर सेंद्रिय मालाला जो मोबदला मिळायला हवा आहे, तो मिळत नाही. यासाठी सेंद्रिय शेतीमधील सूक्ष्म जीवशास्त्र, मृदाशास्त्र, जैवविविधता तसेच जैवरसायन शास्त्राची माहिती शेतकऱ्यांनी करून घ्यावी.
रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, तसेच जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस कमी होत जाते. एवढीच माहिती शेतकऱ्यांना आहे. गांडूळ खत, शेणखतापुरतीच सेंद्रिय शेतीची व्याप्ती शेतकऱ्यांच्या मनात रुजलेली आहे. सेंद्रिय शेतीमध्ये असलेले सूक्ष्म जीवशास्त्र, मृदाशास्त्र, जैवविविधता, विज्ञान तसेच जैवरसायन शास्त्र याबद्दलची माहिती बहुतांशी शेतकऱ्यांना माहीत नाही. शेतकरी ज्या निविष्ठा वापरतात त्यांचा जमिनीची सुपीकता, पिकाच्या वाढीशी असणारा संबंध शेतकऱ्यांना अजूनही माहीत नाही, त्यामुळे सेंद्रिय शेतीमध्ये जैविक निविष्ठांचा योग्यरीतीने वापर होताना दिसत नाही. शेतावर घरगुती पद्धतीने ज्या निविष्ठा बनविल्या जातात, त्यांचे योग्य तंत्र अवगत नसल्याने त्या निविष्ठांचा प्रभाव कमी प्रमाणात होऊन पिकांना त्याचा जितका फायदा व्हायला हवा तितका तो होताना दिसत नाही. पिकाच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत रोग व कीड नियंत्रणासाठी नेमक्‍या कुठल्या जैविक निविष्ठा वापरायच्या याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. कृषी विद्यापीठांमध्येही सेंद्रिय शेतीबाबत संशोधनाला म्हणावी तशी गती दिसत नाही. येत्या काळात सेंद्रिय शेती करताना त्यातील तंत्रज्ञान समजावून घेतले पाहिजे.


स्थानिक बाजारपेठेत सेंद्रिय मालाला योग्य मोबदला न 

मिळणे -


अजून आपल्याकडे स्वास्थ व आरोग्य विषयाबाबतची जागरूकता म्हणावी इतकी आलेली दिसत नाही, त्यामुळे स्थानिक स्तरावर सेंद्रिय मालाला जो मोबदला मिळायला हवा आहे, तो मिळत नाही. सेंद्रिय भाजीपाला व फळे रासायनिक मालाच्या तुलनेत कमी आकर्षक असल्याने सामान्य व मध्यम ग्राहकवर्ग रासायनिक निविष्ठांचा वापर केलेल्या शेतीमालाला जास्त पसंती देताना दिसतो, त्यामुळे सेंद्रिय मालाला स्थानिक बाजारपेठेत म्हणावा असा ग्राहकवर्ग मिळत नाही. अजूनही स्थानिक बाजारपेठेतील ग्राहक जास्त पैसे देऊन सेंद्रिय माल खरेदी करण्यात रस दाखवत नाही.


जैविक घटकांची कमतरता -


आपल्याकडे बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. सेंद्रिय शेती पद्धतीसाठी लागणारा जैविक घटक उदा. शेण, गोमूत्र, काडीकचरा, पालापाचोळा, तसेच कर्बयुक्त पदार्थ हवे तेवढे मिळत नाहीत. त्यामुळे गांडूळ खत, कंपोस्ट खत बनविताना शेतकऱ्यांना बऱ्याचदा अडचणी येतात. बाष्पीभवन टाळण्यासाठी व ओलावा टिकवून ठेवण्यासाठी जैविक आच्छादन पुरेसे उपलब्ध होत नाही.


जैविक निविष्ठांचा निकृष्ट दर्जा व वाजवी किंमत -


आज बाजारात विविध प्रकारच्या जैविक निविष्ठा विक्रीसाठी आहेत. सूक्ष्म जिवाणूयुक्त खते, ह्मुमिक आम्ल, अमिनो आम्ल, गांडूळ खत, सिलिकासारखी जैविक भूसुधारके, कीड- रोग नियंत्रणासाठी निमार्क, करंज तेल, जीवामृत, जैविक कीडनाशके बाजारात उपलब्ध आहेत; परंतु या निविष्ठा सेंद्रिय प्रमाणीकरण केलेल्या असतीलच असे नाही. चुकीच्या घटकांचे लेबल लावून शेतकऱ्यांची फसवणूक होत असलेली बरीचशी उदाहरणे आपल्यासमोर आहेत. अशी उत्पादने अगदी वाजवी दरात विकली जातात; परंतु त्याचा कुठलाही फायदा पिकांसाठी किंवा मातीच्या सुपीकतेसाठी होताना दिसत नाही. दुसरीकडे प्रमाणीकरण असलेल्या जैविक निविष्ठा या खूप महाग आहेत.


जैविक निविष्ठांची वितरण समस्या  -


फार कमी प्रमाणात प्रभावशाली जैविक निविष्ठा बाजारात उपलब्ध असतात, त्यामुळे बऱ्याचदा शेतकरी कमी प्रतीच्या जैविक निविष्ठांचा वापर करतात, त्यामुळे पाहिजे असलेला फायदा होत नाही. त्यामुळे काही वेळा रासायनिक निविष्ठांचा वापर करावा लागतो.


योग्य कृषी धोरणाचा अभाव -


केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेंद्रिय शेती धोरणाचा जर विचार केला, तर तुरळक सेंद्रिय शेतीच्या योजना राज्यामध्ये राबविल्या गेल्या. उदा. सेंद्रिय शेतीसाठी राष्ट्रीय केंद्र, गाझियाबाद तर्फे राबविण्यात येणारी सेवा पुरवणाऱ्या गटाची योजना (1500 शेतकऱ्यांसाठीची योजना - राज्य व केंद्र सरकारचा सहभाग), महाराष्ट्र राज्य कृषी खात्याचा कृती आराखडा (20 शेतकरी गट), राष्ट्रीय फळे व भाजीपाला महामंडळाचा सामूहिक शेती गट (50 शेतकरी गट). यातील बऱ्याचशा योजना मध्येच बंद पडल्या. या योजनेचा जो पाठपुरावा व्हायला हवा होता, तो झालेला दिसत नाही. केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून सेंद्रिय शेती योजनेसाठीचा निधी इतर शेती योजनांचा विचार केला तर फार कमी प्रमाणात आहे, त्यामुळे जो परिणामकारक बदल अपेक्षित होता तो झाला नाही.


कमी उत्पादकता -


सेंद्रिय शेतीमधून उत्पादकता वाढायची असेल तर जमिनीतील सेंद्रिय कर्बाची वाढ जिवाणूंमार्फत होणे गरजेचे असते. ही जैविक प्रक्रिया असल्याकारणाने सेंद्रिय शेतीतून रासायनिक शेतीप्रमाणे उत्पादन मिळण्यासाठी तीन ते चार वर्षांचा कालावधी लागतो. त्या कालावधीमध्ये अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन शेतकऱ्याला मिळते, तसेच स्थानिक पातळीवर सेंद्रिय शेतीमालाला जास्तीचा दर मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक कुचंबणा होऊन तो सेंद्रिय शेतीपासून परावृत्त झालेला दिसतो.


प्रमाणीकरणाबद्दलचे अज्ञान -


सेंद्रिय शेतीमालाच्या विक्रीचा विचार करता स्थानिक बाजारपेठेत सेंद्रिय उत्पादनांची मागणी वेगाने वाढताना दिसत नाही; परंतु थर्ड पार्टी प्रमाणित सेंद्रिय उत्पादनांना निर्यातीसाठी मागणी मोठ्या प्रमाणात दिसते. सेंद्रिय प्रमाणीकरणाबद्दलच्या गैरसमजुती तसेच प्रमाणीकरणातील मानकांचे अज्ञान यामुळे जितकी मागणी आहे तेवढा पुरवठा होत नाही. यासाठी प्रमाणित सेंद्रिय शेती महत्त्वाची आहे.


सेंद्रिय शेती गणितातील चुकीचे तर्क -


आज जर आपण सेंद्रिय शेतीच्या निविष्ठांचा विचार केला, तर त्यांच्या मात्रांचे जे प्रमाण आहे, ते रासायनिक निविष्ठांच्या मात्रेशी तुलना करून दिले जाते. उदा. युरियातून 46 टक्के नत्र मिळते; परंतु कंपोस्ट खताचा विचार केला तर 0.4-0.8 टक्केच नत्र मिळते; परंतु सेंद्रिय शेतीचा शास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर ही एक जैविक प्रक्रिया आहे. त्याचा या मात्रांशी कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. जे विघटन होणारे पदार्थ आहेत, ते जिवाणूंचे खाद्य असून, त्यांचा सेंद्रिय कर्बाच्या निर्मितीत मोठा वाटा असतो. जेवढा जमिनीतील सेंद्रिय कर्ब जास्त, तेवढी जमीन सुपीक असते. बऱ्याचदा या जैविक प्रक्रिया शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाहीत, त्यामुळे निविष्ठांचा विपरीत परिणाम होऊन जो फायदा व्हायला हवा तो होताना दिसत नाही.


उपाययोजना -


1) आपल्या देशात बऱ्यापैकी सर्व प्रकारचा भाजीपाला, फळे, तृणधान्य, गळीतधान्ये, डाळवर्गीय पिके बाराही महिने पिकतात. त्यामुळे आपल्या या शेतीमालाला परदेशांतून मागणी वाढते आहे. थर्ड पार्टी प्रमाणीकरण गटाच्या माध्यमातून सामान्य शेतकरी देखील मानकांनुसार शेती करू शकतो. प्रमाणित शेतीला विपणनाची चांगली जोड मिळू शकते.
2) राज्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे तंत्रज्ञान विद्यापीठांच्या माध्यमातून द्यायला हवे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये सेंद्रिय शेती संशोधन व प्रसार होण्याकरिता प्रयत्न वाढले पाहिजेत, तसेच प्रमाणीकरणाच्या मानकांचे विश्‍लेषण शास्त्रीय भाषेत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले तर मानकांच्या बाबतीतील गैरसमज दूर होतील. सेंद्रिय शेतीतील सेंद्रिय पिकांसाठीचे पीकनिहाय तंत्रज्ञान प्रायोगिक तत्त्वावर विकसित करावे, त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा अवलंब करणे सोपे जाईल.
3) राज्याचे सेंद्रिय शेतीचे धोरण जाहीर झाले आहे, त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण द्यावे. राज्य सरकारने थर्ड पार्टी प्रमाणित सेंद्रिय शेती कशी विकसित करता येईल, याकडे विशेष लक्ष द्यावे. गावपातळीवर सेंद्रिय मालाला विशेष दर्जा व समाधानकारक किंमत मिळेल अशी यंत्रणा विकसित करावी. सेंद्रिय मालाला हमीभाव कसा देता येईल यासाठी विशेष प्रयत्न करावेत. शहरांमध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्रीसाठी सुनियंत्रित यंत्रणा विकसित करावी. निर्यातक्षम सेंद्रिय मालाला योग्य बाजारपेठ, तसेच संबंधित शेतकऱ्यांना योग्य बोनस किंमत मिळावी. सेंद्रिय शेतीमालासाठी शीतगृहांची तालुक्‍याच्या ठिकाणी उपलब्धता झाली पाहिजे.
4) कृषी विभागाने सेंद्रिय शेतकऱ्यांचे गट तयार करावेत. या गटांसाठी प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करावे. सेंद्रिय शेतीच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोचविल्या पाहिजेत. निधीचा परिणामकारक वापर झाला पाहिजे. नियंत्रित व प्रमाणित जैविक निविष्ठा शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्याव्यात.
5) आरोग्य व निसर्गाच्या समतोलाचे महत्त्व लक्षात घेऊन शालेय अभ्यासक्रमात सेंद्रिय शेती विषयाचा समावेश करावा.
सामाजिक संघटना व आरोग्य विभागाने सामान्य नागरिकांमध्ये जागृती निर्माण करावी.

1) प्रमाणित सेंद्रिय शेतीचा विचार करता देशात सुमारे 4.43 दशलक्ष हेक्‍टर जमीन सेंद्रिय शेतीखाली आहे, त्यापैकी 0.24 दशलक्ष हेक्‍टर जमीन ही पूर्णतः प्रमाणित आहे.
2) गेल्या वर्षी देशामध्ये सुमारे 3.88 दशलक्ष टन सेंद्रिय शेतीमालाचे उत्पादन झाले होते, त्यापैकी सुमारे 6,99,837 टन सेंद्रिय शेतीमालाची निर्यात झाली. यातून सुमारे 699 कोटी रुपये मिळाले.
3) एकूण निर्यातीमध्ये प्रमाणित सेंद्रिय मालाचे प्रमाण हे चार टक्के इतके आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी प्रमाणित सेंद्रिय शेतीमालाच्या निर्यातीमध्ये सुमारे 33 टक्के वाढ झाली.
4) आपल्याकडे गळीत धान्य, कापूस, बासमती तांदूळ, चहा, तीळ, मध, तृणधान्य व डाळवर्गीय पिकांचे सेंद्रिय पद्धतीने मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.
5) राज्याचा विचार केला तर सुमारे 1.50 लाख हेक्‍टर जमिनीचे सेंद्रिय प्रमाणीकरण झाले आहे. राज्यात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, डाळवर्गीय पिके, तृणधान्य व गळीत धान्याचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतले जाते.


देशातील सेंद्रिय शेती -



1) राज्यांचा जर विचार केला, तर 2003 मध्ये सिक्कीम हे राज्य संपूर्णतः सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करण्यात आहे; तसेच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मिझोराम, आसाम, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, केरळ या राज्यांत प्रमाणित सेंद्रिय शेतीचे क्षेत्र वाढते आहे.
2) कर्नाटकातील धारवाड कृषी विद्यापीठामध्ये सेंद्रिय शेती संशोधन व प्रसार करण्याकरिता स्वतंत्र अशी सेंद्रिय शेती विद्याशाखा सुरू करण्यात आली आहे. येथील संशोधन केंद्रातून 14 पिकांसाठी पीकनिहाय सेंद्रिय तंत्रज्ञान प्रत्यक्ष प्रायोगिक तत्त्वावर प्रसारित करण्यात आले आहे; तसेच 65 पिकांसाठी पीकनिहाय सेंद्रिय तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
3) बिहारमध्ये ज्या शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्याखाली तसेच धरणाच्या पाण्याच्या फुगवट्याखाली जाते, अशा जवळपास आठ हजार शेतकऱ्यांचे सेंद्रिय शेती प्रशिक्षण व प्रमाणीकरणाचा खर्च स्वतः राज्य सरकार करत आहे. या शेतकऱ्यांच्या सेंद्रिय पिकांच्या विक्रीची राज्य शासनाने व्यवस्था केलेली आहे.
4) जम्मू- काश्‍मीर, ओरिसा व झारखंड राज्यांनी सेंद्रिय धोरण जाहीर करून अंमलबजावणी सुरू केली आहे.